गढवाल हिमालयचे गॅझेटियर लिहिणारे इंग्रस आयसीएस अधिकारी एचजी वॉल्टन यांनी 1910 मधील जोशीमठचा उल्लेख केलाय. घरं, रात्रीचे निवारे, मंदिरं आणि चौकोणी आकाराच्या दगडांपासून तयार केलेला शहराचा चौक असलेलं शांत शहर, असा तो उल्लेख आहे. याच्या गल्ल्यांमध्ये कधीतरी व्यवसायाच्या हंगामात तिबेटमधून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या याक आणि घोड्यांच्या घंट्यांचा आवाज येत असावा, असं त्यात म्हटलंय. जुन्या काळात या व्यापाऱ्यांच्या वर्दळीमुळं जोशीमठ ही एक संपन्न बाजारपेठ असावी. पण वॉल्टन यांच्या कालखंडापर्यंत या व्यापाऱ्यांनी त्यांचे बाजार दक्षिणेकडे म्हणजे नंदप्रयाग आणि त्याच्याही पुढं स्थलांतरीत केले होते. ‘या’ वर्षी मकर संक्रांती १५ जानेवारीला; ३२४६ साली मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येणार वॉल्टन यांनी तिबेटच्या ज्ञानिमा मंडीमध्ये पिढ्यान्…
Author: mahalokwani
ठाणे : या वर्षी शनिवार, दि. १४ जानेवारी रोजी रात्री ८.४४ वा. सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांती रविवार, दि. १५ जानेवारी रोजी आली आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. निरयन मकर संक्रांती दरवर्षी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही, असेही ते म्हणाले. आता कुठूनही करता येणार मतदान, काय आहे RVM मशीन? RVM मशीन कसं काम करतं? सोमण म्हणाले की, सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे-पुढे जात असतो. सन २०० मध्ये…
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. मात्र, भारतात मतदानाचा टक्का कायम घसरलेलाच असतो. स्थलांतर हे त्यामागचं खूप मोठं कारण आहे. कारण, स्थलांतरीत मतदारांना मतदानासाठी सुट्टी टाकून गावाकडे येणं शक्य नसते. परिणामी मतदानामध्ये घसरण होते. हीच बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेतला. स्थलांतरित नागरिकांना दुसऱ्या राज्यातूनही आपल्या मूळ गावी मतदान करता यावं, यासाठी नवीन यंत्रणा विकसित केलीये. दरम्यान, ही RVM यंत्रणा आहे तरी काय? ती कसं काम करते? याच विषयी जाणून घेऊ. घरापासून दूर राहणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने रिमोट व्होटिंग सिस्टीम तयार केलीये. निवडणूक आयोगाने ही घोषणा केलीये. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते…
मुंबई: पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीच्या आसामविरुद्धच्या सामन्यात आपले तांडव चालूच ठेवले. या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पृथ्वी २४० धावांच्या पुढे मैदानात उतरला आणि पुन्हा एक झंझावाती खेळी त्याने खेळली. आता त्याने त्रिशतक झळकावून आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या बनवली. त्रिशतक गाठण्यासाठी पृथ्वीने ३२६ चेंडूंचा सामना केला. आसामचा गोलंदाजांचा त्याने असा काही समाचार घेतला की त्यांना हैराण करून सोडले. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पृथ्वी शॉ पहिल्या दिवसाच्या २४० धावांच्या पुढे खेळायला आला. पण, दुसऱ्या दिवशी त्याने पुढच्या ६० धावा इतक्या वेगाने केल्या की ३०० धावांचा पल्ला त्याने कधी गाठला हे…
महालोकवाणी न्यूज:- संपादक:- सचिन कांबळे पाटील – 9604737188 पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे महालोकवाणी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 अंजनगाव तालुका बारामती येथे रात्रीच्या वेळेस अवैद्य वाळू उत्खनन जोरात सुरू आहे.या ठिकाणी बेसुमार उत्खनन झालेले असून लाखो रुपयांची शासनाची. मालमत्ता चोरून नेहलेली आहे.या कर्हा नदीच्या पात्रामध्ये आपणाला मोठे मोठे खड्डे पाहायला मिळत आहे.याच गावातील एका पुढाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले की या ठिकाणी रात्रीचे वेळी दोन जेसीबीने आणि पाच ते सात ट्रॅक्टर यावेळी बेसुमार वाळू उपसा करून वाहतूक करत .गावात व इतरत्र विक्री करून लाखो रुपये कमवत आहेत . आसाच वाळू उपसा चालू राहिला तर नदिचा प्रवाह बदलू शकतो…
पत्नीने तक्रार दखल केल्याचा राग महालोकवाणी न्यूज पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून संतोष उर्फ पप्पू भिमाजी खोसे याने गावठी कट्टयाचा धाक दाखवून तुला रहायचे आहे का? तुला गोळया घालून ठार मारून टाकेल अशी धमकी दिल्याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यासंदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अरूण गणपत दाते ( वय ४२,रा. वासुंदे) हे राहत्या घराजवळील विहीरीवरुन पाणी आणण्यासाठी गेले असता संतोष खोसे तेथे आला. तुझ्या बायकोने माझ्या विरूध्द पोलिस ठाण्यात फिर्याद का दिली ? तुला जिवंत गोळया घालून ठार मारून टाकेल अशी धमकी दिली. त्याच्यासोबत विकास सुरेश रोकडे…
महालोकवाणी न्यूज:- पुणे, 11 जानेवारी : एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव सरकार असे अभियान राबवत असताना पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी आईला CCTV च्या आधारे मंचर पोलिसांनी तीन तासांत पकडले. आईपणाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली. जन्म देताच पोटच्या गोळ्याला आईनेच क्षणात अनाथ करत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोडले. नवजात बालिका नकोशी झालेल्या जन्मदात्या आईचा शोध घेऊन CCTV च्या आधारे तीन तासांत मंचर पोलिसांनी तिला अटक केली. एकीकडे ‘बेटी बचाव बेटी पढाव..’ चा नारा बुलंद केला जात असताना मुलगी झाली तेच तिला नकोशी केलं…! आई…
बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न महालोकवाणी न्यूज:- नाशिक, प्रतिनिधी) ः दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचेे औचित्य साधून शनिवार दि. 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार मेळावा व दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिकच्या मुं.श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय शालिमार, नाशिक येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. आपण बँक लोन साठी पात्र आहात की नाही असे चेक करा समाजाला दिशा दाखविण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींना दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन…
लवकरात लवकर कारवाई न केल्यास दि. २० जानेवारी रोजी ग्रामस्थ करणार रास्ता रोको आंदोलन….! शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )दि. १०/०१/२०२३ शेवगाव तालुक्यातील मौजे सुकळी येथील सन २०२१-२२ या कालावधीत विविध विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करून दोषींवर १५ दिवसात कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. अन्यथा शुक्रवार दि.२० जानेवारी २०२३ रोजी शेवगाव- गेवराई रोडवर सुकळी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी लेखी मागणी मौजे सुकळी येथील ग्रामस्थांच्या वतीने तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लहूराव भवर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले…
पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे महालोकवाणी न्यूज :- दिनांक 10 जाने 2023 जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या हस्ते आज दिनांक 10 /01/ 2023 रोजी संपन्न झाले या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले बारामती शहराचा विकास केल्याने पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास होत नाही तसेच बारामतीच्या के व्हि.के च्या कृषी प्रदर्शना प्रमाणे भारतीय जनता पार्टी कसलेही शुल्क शेतकऱ्यांकडून घेत नाही कृषी प्रदर्शनाचा.सर्व शेतकऱ्यांना फायदा मोफत होणार आहे व हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांसाठी खुले आहे असे ते म्हणाले।फेसबुक लाईव्ह आल्याने .महाराष्ट्रातील प्रश्न सुटत नाहीत असे म्हणत सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता…