पारनेर : प्रतिनिधी न्यायाधीश म्हणून काम करताना अनेक बंधने पाळावी लागतात. या बंधनांमध्ये तसेच कायद्याच्या चौकटीत राहून पारनेर न्यायालयातील न्यायाधीश उमा बोराडे यांनी सामाजिक बांधिलकी निभावली. त्यांची पनवेल येथे बदली झाली असून त्यांच्या सामाजिक कार्याला यावेळी अनेक वकीलांनी उजाळा दिला. पारनेर न्यायालयाच्या न्यायाधीश उमा बोराडे यांंची पनवेल येथे बदली झाली असून पारनेर वकील संघाच्या वतीने त्यांचा नुकताच हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. न्यायदानाने पवित्र कार्य निभावताना सामाजिक कार्यातही त्या सक्रीय असत. कोरोनाच्या संकटामध्ये निघोज येथील निवरा गृहामध्ये नांदेड येथील १०५ मजूरांना ठेवण्यात आले होते. मजूरांमधील रूपाली राहुल हुडकर हीम महिला प्रसुत झाली. एकीकडे…
Author: mahalokwani
नगर – तहान लागल्यावर विहिर खोदण्यापेक्षा अगोदरच पाण्याची सोय करावी म्हणजे भविष्यात अडचणी येणार नाही. त्याप्रमाणे उद्याच्या सावलीकरीता आज झाडे लावावी. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, भावीपिढी निरोगी राहण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र.2 मध्ये नगर फौंडेशन आणि गिरीकर्णिका ग्लोबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 100 झाडांचे वृक्षारोपण पूर्ण करण्यात आला. येणाऱ्या काळात वार्डात दहा हजार वृक्ष लागवड करणार आहे यावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे, वनरक्षक राजश्री राऊत, फौंडेशनचे रविंद्र गोरे, गिरीकर्णिका ग्लोबल फौंडेशनचे जगदीश शिंदे, राजेंद्र खेडकर, धनंजय मोकासे, सचिन…
आष्टी ( प्रतिनिधी–गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील सरकारी रस्ते, पाटबंधारे विभागाचे कालवा रस्ते, सर्विस रोड, अतिक्रमित झाले असून सदरील..रस्ते खुले करणे बाबर जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी सांगितले आहे की, आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरकारी रस्ते, तसेच पाटबंधारे विभागाने तयार केलेले कालवे,त्यांच्या शेजारचे रस्ते, सर्विस रोड,पाणंद रस्ते, शिवरस्ते, हे रस्ते धनदांडगे शेतकऱ्यांकडून अतिक्रमित झालेले असून.. गरीब शेतकऱ्यांना हे रस्ते बंद झाल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत आष्टी तालुक्यातील धामणगाव, दौलवडगाव, दादेगाव, कडा, पिंपळा, खडकत, आष्टी, ब्रह्मगाव, पाटसरा, डोईठाण, पांढरी, डोंगरगण, हरिनारायण आष्टा, या ठिकाणी अनेक रस्ते भूमी अभिलेख कार्यालयातील नकाशावर दिसत आहेत. परंतु…
संगमनेर मधील भगवा मोर्चाला गालबोट दोन गटात दगडफेक तणावाची स्थिती निर्माण अहमदनगर जिल्ह्यातील भगव्या मोर्चाला गालबोट लागली आहे या मोर्चानंतर मोठी दगडफेक झाली आहे दोन गटात मोठा राडा झाला आहे . त्यामुळे अहमदनगरच्या समनापुर गावात तणावाची शेती निर्माण झाली आहे या दगड पैकी मध्ये एक जण जखमी झाला असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे तत्काळ या ठिकाणी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मोर्चात सहभागींना शांत राहण्याचे आवाहन करीत आहेत संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला वाढते गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद विरोधात भगवा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चातून गावाकडे परतत असताना हा प्रकार घडला मोर्चादरम्यान…
रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी ‘ माऊली संकुल ‘ झोपडी कॅन्टीन येथे ‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबाची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते श्री देवदत्त नागे यांच्या शुभहस्ते श्री सांदिपनी ॲकॅडमीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तानाजी’ व ‘ आदिपुरूष’ या चित्रपटांतील भूमिकेमुळे श्री देवदत्त नागे हे लोकांच्या मनामनांत व घराघरांत पोहोचले आहेत रविवारी सकाळी दहा वाजता प्रमुख पाहुणे श्री देवदत्त नागे यांचे माऊली संकुल येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे रांगोळी काढून तसेच आरती ओवाळून मोठे जंगी स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री देवदत्त नागे, श्री बालराजू सर, प्रभू गिरीवरधारी, श्री राहुल गुजराल सर, श्री नानासाहेब बारहाते सर तसेच प्राध्यापक…
नगर _ जिल्हा परिषद अहमदनगर येथील माध्यामिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व अधिक्षक सत्यजित मच्छिंद्र यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक गंभीर तक्रारी आहेत यासाठी विविध संघटनांनी अंदोलने केलेली आहेत या सर्व बाबींची दखल घेऊन शिक्षण आयुक्त पुणे यांनी या दोघांचा निलंबनाचा प्रास्ताव शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दिपक केसरकर यांना सादर केलेला आहे परंतु दोन महिने झाले तरी अद्याप त्यांना निलंबीत करण्यात आले नाही . त्यामुळे शिक्षक व समाजात चुकीचा संदेश जात आहे कर्तव्यदक्ष मंत्री महोदयांनी अशा भ्रष्टाचारी अधिकार्याना पाठीशी घालणे योग्य नाही . त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसात निलंबीत करावे अन्यथा त्यानंतर केव्हांही पूर्वसुचना न देता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शालेय…
कर्जत- जामखेड :प्रतिनिधी धनराज पवार ॲड.डॉ. अरुण जाधव वंचित बहुजन आघाडी राज्य समन्वयक आणि शब्बीर भाई पठाण वृद्ध भूमीहीन संघटना यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.5 जून 2023 रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर जवाब दो मोर्चा वंचित बहुजन आघाडी, वृद्ध भूमिहीन शेतमजूर, महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, लोक अधिकार आंदोलन संघटना, एकलव्य संघटना, पारधी विकास कृती समिती यांच्या वतीने काढण्यात आला होता. या मोर्चाचे मुख्य नेतृत्व ॲड. डॉ. अरुण जाधव असून गायरान जमीन नियमाकुल करून सातबारावर नोंद लावणे, भूमिहीन लोकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीत सवलत मिळावे, कर्जत तालुक्यात 1972 ते 2022 रोजी झालेल्या झोपडपट्ट्या कायम करण्यात यावात व त्यांची सिटी सर्वे वर नोंद करण्यात यावी,…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून बौद्ध तरुणाची हत्या केल्याच्या निषेधार्थ नगरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार अहमदनगर प्रतिनिधी (दि.५ जुन):- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावांमध्ये अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांची जातीयवादी गावगुंडांद्वारे निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या क्रूर हत्याकांड घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकाच्या वतीने दि.५ जुन रोजी टिळकरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या संदर्भात बैठक झाली.व सर्वानुमते अक्षय भालेराव या भीमसैनिकाला न्याय मिळावा यासाठी भव्य जण आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहून विराट भिमशक्तीच दर्शन घडवून घडवून मोर्चात सहभागी व्हावे असे आंबेडकरी चळवळीतील…
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे , व उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते या, यावेळी अहमदनगर शहराचे नाव बदलून आहिल्यानगर ठेवण्याची घोषणा करण्यात आली, या कार्यक्रमावेळी जामखेड शिवसेना तालुका प्रमुख मा . प्रा . कैलास माने यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला . यावेळी सत्कार प्प्रसंगी बोलताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे यांनी प्रा . कैलास माने यांच्या कामाचे तोंडंभरुन कौतुक केले, जेव्हा पासून माने यांच्यावर जामखेड तालुक्याची जबाबदारी दिली आहे , तेव्हा पासून त्यांनी…
नेप्ती तालुका अहमदनगर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या आद्यवत संगणकीय प्रयोगशाळा, पुरेशी इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व विभूषित योग्य संवाद साधणारा प्राध्यापक वर्ग इत्यादी बाबींचा विचार करून राज्य तंत्र संचनालय, मुंबई यांच्या वतीने श्री छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रथम वर्ष पदविका अर्थात डिप्लोमा प्रवेशासाठी दिनांक 1 जून साठी प्रथम वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश सुविधा केंद्र सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी 21 जून पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय आर खर्डे यांनी दिली. पुढे बोलताना डॉ वाय आर खर्डे म्हणाले की, राज्य तंत्र…