मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे उद्या उपस्थित असणार आहेत. यावेळी खडसे यांची पंकजा मुंडे, त्यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत राजकीय चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उद्या भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीत राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.…
Author: mahalokwani
जामखेड :- प्रतिनिधी धनराज पवार उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याची पातळीही खालावत आहे. या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी कुकडी आणि सीना कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही भरण्याची आणि आवर्तनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना भेटून दिले आहे. कर्जत-जामखेड हा अवर्षणग्रस्त भाग आहे. उन्हाळ्यात या भागातील भूगर्भातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावते. त्यामुळे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी कुकडी आणि सीना या कालव्यांचा मोठा आधार आहे. परंतु सद्यस्थितीत योग्य नियोजनाअभावी सर्व गावांना पाणी मिळेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भोसे खिंडीतून…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा अहमदनगर ची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकी मध्ये जामखेड तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी श्री.युवराज (दादा) गोकुळ पाटील यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी बिनाविरोध निवड झाली.सदर निवडी प्रसंगी जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी बांधवांचे त्यांना सहकार्य लाभले. या निवडी बद्दल सोलापूर येथील ग्रामसेवक संघटनेचे नेते श्री.लक्ष्मण तात्या गळगुंडे पाटील , अहमदनगर जिल्हा अध्यक्ष एकनाथ ढाकणे , मा.प्रकाश पोळ गटविकास अधिकारी यांनी त्यांचेअभिनंदन केले.. त्यांच्या या निवडी बद्दल अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गामधून आनंद व्यक्त होत आहे….
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवारजामखेड लोकवस्ती मधून जाणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाह वाहिनीवर कापरी पाईप, पट्टी बसाव्यात, तसेच येत्या पाऊस काळात नागरिकांच्या जीविताला संरक्षण द्यावे अश्या विविध मागणीचे निवेदन दिले जामखेड तालुक्यातील जामखेड शहरासह लोकवस्त्या वरील काही गावात मुख्य प्रवाहाच्या वाहिनी गेलेल्या आहेत. तरी खूप वर्षापूर्वी या विद्युत वाहिन्याचे कामे झालेले आहेत. तदनंतर मानवी शहर वस्ती वाढलेली आहे. त्यातच ऊन, वारा, पाऊस यामुळे विद्युत खांबावरील ताण व तसेच विद्युत वाहिन्यांची झालेली झीज याने बऱ्याच ठिकाणी नागरीकांचे व शेतकऱ्यांचे जीवीत हानीसहीत नुकसान होत आहे. विद्युत वाहिन्यांच्या तारा अचानक तुटत आहेत, खांबे सुद्धा अचानक कोलमडत आहेत. त्यातच काही डि. पी. चे फ्युजाचे दरवाजे सुद्धा…
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा SSC Result 2023 निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. अखेर शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर ( SSC result 2023) होणार आहे. सकाळी 11 वाजता SSC बोर्डाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता निकाल हा बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर होईल. SSC पास होण्यासाठी नक्की किती मार्क्स आवश्यक आहेत? स्टेट बोर्डाच्या SSC परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये किमान 35 टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेतही विद्यार्थी…
जून महिना उद्यापासून सुरू होईल आणि RBI ची 100 Days 100 Pays मोहीमही सुरू होईल. ज्या अंतर्गत तुम्ही 10 वर्षांपासून वापरत नसलेले खाते पुन्हा सुरू करण्याचा दावा करू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 2000 च्या नोटा बदलण्यासाठी जून महिन्यात बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर बँकेत जाण्यापूर्वी, RBI ने जारी केलेली बँक हॉलिडे लिस्ट नक्कीच तपासा. जून महिन्यात तुम्हाला 12 दिवस बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलण्याची संधी मिळणार नाही. कारण जून महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. 100 डेज 100 पेज मोहिमेची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वी केली होती. त्याची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरू होणार आहे. दावा न केलेल्या…
नेप्ती अहमदनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील 40 विद्यार्थ्यांची विविध मल्टिनॅशनल , नॅशनल कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने अग्रगण्य टीसीएस, याझकी इंडिया, वरफुल इंडिया , सेको इंडिया , क्रॉम्प्टन ग्रीव्हज , स्नाईडर इलेक्ट्रिकल्स इत्यादी कंपन्यांचा समावेश होतो अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय आर खर्डे यांनी दिली. या निवडी मध्ये संगणक विभागातील अयाची फॉर्म मध्ये निवड झाली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक पॅकेजेस 4-7 लाखांच्या दरम्यान आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शुभम मराठे , निमसे दत्तात्रेय , वाणी दीपक, रिजवान बागवान, सोमेश अकोलकर, गोरे शेखर, कडू संकेत, मोहोळकर ईश्वर, भांडे यशवंत, काटकर विवेक, अभिषेक आवारे,…
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे , व उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते. यावेळी आधी बोलताना उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले कि, लवकरच अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर होणार असल्याची घोषणा करण्यात आली , चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९८ यांची जयंती वेगवेळ्या कारणांनी चर्चेत राहिली, आमदार रोहित पवारांना यावेळेस प्रशासनाने परवानगी नाकारली होती , उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलले कि, उस्मानाबाद चे धाराशिव , औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर नाव बदलेले आहे, आत्ता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी नगर हे होणार आहे, याच वेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलेल्या घोषणेला महाराष्ट्राचे…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला काल रात्री चौंडी इथं क्षिप्रा, नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा, रामेश्वर, तापी आणि कृष्णा या सात नद्यांचं पाणी आणि राज्याच्या विविध भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवमधील कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने मतदारसंघातील जोडप्यांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन अभिवादन केलं. चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त २९८ फटाक्यांची एक तास नेत्रदीपक आतषबाजी करुन राज्यभरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन केलं. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातील खर्डा चौक येथे आज रोजी सकाळी ९ वाजता पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ् या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्ती चे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोहन (मामा) गडदे म्हणाले ,पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर म्हणजे स्वाभिमानी, निर्भिड व विज्ञानवादी नेतृत्व. आहिल्याबाई ने सर्व अंद्धश्रद्धा व अनिष्ठ रुढीवर प्रहार करून समाजाला विज्ञानवादी बनवण्यासाठी त्यांचे कार्य होते.विकास मासाळ म्हणाले की,लोककल्याणाच्या योजना कशा असाव्या हे सर्व पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाईंचा राज्यकारभार बघितल्यानंतर कळते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय खरात,रासपाचे युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन…