महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा SSC Result 2023 निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. अखेर शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर ( SSC result 2023) होणार आहे. सकाळी 11 वाजता SSC बोर्डाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता निकाल हा बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर होईल. SSC पास होण्यासाठी नक्की किती मार्क्स आवश्यक आहेत? स्टेट बोर्डाच्या SSC परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये किमान 35 टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेतही विद्यार्थी…
Author: mahalokwani
जून महिना उद्यापासून सुरू होईल आणि RBI ची 100 Days 100 Pays मोहीमही सुरू होईल. ज्या अंतर्गत तुम्ही 10 वर्षांपासून वापरत नसलेले खाते पुन्हा सुरू करण्याचा दावा करू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 2000 च्या नोटा बदलण्यासाठी जून महिन्यात बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर बँकेत जाण्यापूर्वी, RBI ने जारी केलेली बँक हॉलिडे लिस्ट नक्कीच तपासा. जून महिन्यात तुम्हाला 12 दिवस बँकांमध्ये 2000 च्या नोटा बदलण्याची संधी मिळणार नाही. कारण जून महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. 100 डेज 100 पेज मोहिमेची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वी केली होती. त्याची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरू होणार आहे. दावा न केलेल्या…
नेप्ती अहमदनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील 40 विद्यार्थ्यांची विविध मल्टिनॅशनल , नॅशनल कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने अग्रगण्य टीसीएस, याझकी इंडिया, वरफुल इंडिया , सेको इंडिया , क्रॉम्प्टन ग्रीव्हज , स्नाईडर इलेक्ट्रिकल्स इत्यादी कंपन्यांचा समावेश होतो अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय आर खर्डे यांनी दिली. या निवडी मध्ये संगणक विभागातील अयाची फॉर्म मध्ये निवड झाली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे वार्षिक पॅकेजेस 4-7 लाखांच्या दरम्यान आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शुभम मराठे , निमसे दत्तात्रेय , वाणी दीपक, रिजवान बागवान, सोमेश अकोलकर, गोरे शेखर, कडू संकेत, मोहोळकर ईश्वर, भांडे यशवंत, काटकर विवेक, अभिषेक आवारे,…
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे , व उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते. यावेळी आधी बोलताना उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले कि, लवकरच अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर होणार असल्याची घोषणा करण्यात आली , चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९८ यांची जयंती वेगवेळ्या कारणांनी चर्चेत राहिली, आमदार रोहित पवारांना यावेळेस प्रशासनाने परवानगी नाकारली होती , उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलले कि, उस्मानाबाद चे धाराशिव , औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर नाव बदलेले आहे, आत्ता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी नगर हे होणार आहे, याच वेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलेल्या घोषणेला महाराष्ट्राचे…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला काल रात्री चौंडी इथं क्षिप्रा, नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा, रामेश्वर, तापी आणि कृष्णा या सात नद्यांचं पाणी आणि राज्याच्या विविध भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवमधील कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने मतदारसंघातील जोडप्यांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन अभिवादन केलं. चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त २९८ फटाक्यांची एक तास नेत्रदीपक आतषबाजी करुन राज्यभरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन केलं. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातील खर्डा चौक येथे आज रोजी सकाळी ९ वाजता पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ् या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्ती चे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोहन (मामा) गडदे म्हणाले ,पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाई होळकर म्हणजे स्वाभिमानी, निर्भिड व विज्ञानवादी नेतृत्व. आहिल्याबाई ने सर्व अंद्धश्रद्धा व अनिष्ठ रुढीवर प्रहार करून समाजाला विज्ञानवादी बनवण्यासाठी त्यांचे कार्य होते.विकास मासाळ म्हणाले की,लोककल्याणाच्या योजना कशा असाव्या हे सर्व पुण्यश्लोक राजमाता आहिल्याबाईंचा राज्यकारभार बघितल्यानंतर कळते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय खरात,रासपाचे युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ,भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन…
जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी होत आहे. स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे. याच दरम्यान आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, ३१ मे रोजी शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी होत आहे. स्वागताध्यक्ष आ. प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू आहे.अश्यातच आ. प्रा.राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली नगरसेवक अमित चिंतामणी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २९ मे रोजी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कामाची तयारी करण्याकरिता चोंडी येथे गेलो…
राज्यात पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. कधी उन्हाचा तडाखा, तर कधी अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. बदलत्या वातारवरणामुळे काही भागात उष्णतेची लाट सुद्धा आली आहे. अशातच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या ३१ मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत अवकाळी पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. विशेष बाब म्हणजे, रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह अन्य काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.…
नगर : जामखेड येथिल रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर संस्थेच्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे बी.फार्म.सी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील १९ वर्षीय पिडीतेच्या लैगिक शोषण प्रकरणी भास्कर मोरेने दाखल केलेला अटकपूर्व जामीन श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने फेटाळला असून अटकेच्या भितीने मोरे फरार झाला आहे. या बाबत सविस्तर असे की, जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या बी. फार्मसी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थींनींचा लैगिक शोषण केल्या प्रकरणी संस्था चालक भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. ४ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती.…
सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी :यावेळी अनुसूचित जाती-जमाती भटके विमुक्त अधिकार फोरम तथा भाजपचे महाराष्ट्र अनु.जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष ऍड वाल्मिक निकाळजे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी भाजप नेते धनंजय बडे पाटील हे होते. याप्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार जगदीश गाडे,वसंत बोर्डे,अशोक निकाळजे, मानवाधिकार कार्यकर्ते परीक्षित शिंदे,आजीनाथ बडे,तुकाराम बडे,सोनू देठे आदींची व्यसपीठावर उपस्थित होती. गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुस्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ऍड निकाळजे बोलतांना म्हणाले की, आपण बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी करतो ती चांगली गोष्ट आहे. परंतु आपले सर्वात जास्त प्रेम कशावर आहे.तर खाणे,पिणे,नाचणे यावर आहे.डीजे,खाजे, पिजे, गाजे यापलीकडे आपला समाज जात…