दि. 4 जून 2023 रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल ‘ झोपडी कॅन्टीन येथे श्री देवदत्त नागे यांच्या शुभ हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती श्री सांदिपनी ॲकॅडमीचे सर्वेसर्वो श्री बालराजू सर यांनी दिली आहे. रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी श्री सांदिपनी ॲकॅडमी तर्फे Nischay 2.0 परीक्षा आयोजित करण्यात आली होती. काल 20 मे रोजी संध्याकाळी 6.00 वाजता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.दहावीची परीक्षा झाल्यानंतर, 10 वी तून 11 मध्ये जाणाऱ्या विद्यार्थांसाठी श्री सांदिपनी ॲकॅडमी तर्फे 4 एप्रिल ते 10 मे 2023 या काळात मोफत Bridge Course घेण्यात आला होता. यामध्ये JEE, NEET व CET…
Author: mahalokwani
जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमा निमित्त नियोजन बैठक व पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.३१ मे रोजी आहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रमास मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत यामुळे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायत या यात्रेत सहभागी होणारच आहे तसेच आमचा शासकीय कार्यक्रमाला पाठिंबा आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्याअगोदर आमचा कार्यक्रम संपेल असेही आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या यात्रेत आहिल्याबाई होळकर यांची कार्यभुमी…
आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. संसदीय लोकशाही यावर आमचा विश्वास आहे. परंतु, दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे, असे टीकास्त्र शरद पवारांनी मोदी सरकारवर सोडले आहे. संसदीय लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीत निवडून आलेल्या राज्य सरकारकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. सरकार तयार करण्याचा अधिकार व सामान्य जनतेचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी अरविंद केजरीवाल येथे आले आहेत. महाराष्ट्राची जनता ही अरविंद केजरीवाल यांचे समर्थन करेल. राष्ट्रवादी काँग्रेस तर मदच करेलच, असा विश्वास शरद पवारांनी अरविंद…
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड Aadhar card मधील कोणतीही माहिती अपडेट करायची असेल, तर तुम्ही ती आता मोफत अपडेट करू शकता, यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. कारण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) 14 जून 2023 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या आधारमधील माहिती ऑनलाइन अपडेट करण्याची विनामूल्य संधी देत आहे. साधारणपणे, आधार तपशील अपडेट करण्यासाठी 50 शुल्क आकारले जाते. तथापि, UIDAI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन लोकसंख्याविषयक तपशील अपडेट करणे 14 जूनपर्यंत पूर्णपणे विनामूल्य असेल. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की ही सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर मोफत उपलब्ध आहे आणि भौतिक आधार केंद्रांवर 50 रुपये आकारले जातील. UIDAI देशातील सर्व…
HSC 12th results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. २५ मे रोजी बारावीचा निकाल येणार आहे. तर दहावीचा निकाल कधी लागणार? याचे संकेत मिळाले आहे HSC महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या HSC 12 वीचा कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे. कारण नुकतेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले. आता महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा संपली आहे. २५ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल लागणार आहे. तसेच आता दहावीचा निकाल कधी लागणार याची…
पंजाबराव डख
जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार आपल्या देशाचे संरक्षण करीत असताना जे सैनिक धारातिर्थी पडले त्यांच्या कुटूंबियांना,जे अपंग झाले त्यांचे पुनवर्सनासाठी तसेच आर्थिक बाबतीत गरीब असलेल्या माजी सैनिकांना त्यांचे सैन्य निवृत्ती पश्चात दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे.यासाठी विविध आर्थिक मदतीसाठी आपल्या संस्थेच्या कर्मचा-्यां चे सहकार्याने. या शुर सैनिकांबद्दल वाटणारे प्रेम या निधी सशस्त्र सेना ध्वज दिन वर्ष २०१९ – व वर्ष २०२० चा प्रलंबित निधी ४,२४,३०५ रुपये रक्कम दि.२० एप्रिल २०२३ रोजी ध्वज निधी जमा करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहमदनगर येथे जमा करण्यात आलेला आहे. त्याबद्दाल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी गट शिक्षणा धिकारी पंचायत समिती जामखेड यांना दि.११ मे 2023 रोजी…
दि.०४/०५/२०२३ रोजी जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष श्री.डॉ.भास्कर मोरे यांनी एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तुरुणीचे लैंगिक शोषण करून बळजबरी केली आहे.त्या संदर्भात जामखेड पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेज मध्ये महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मुले-मुली शिक्षण घेण्यासाठी येतात.यातील अनेक मुले-मुली ही गरीब घरातील आहेत. आपल्या आयुष्यातील कमावलेली सर्व संपत्ती पणाला लावून हे पालक आपल्या मुलांना या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत असतात. या कॉलेजच्या जवळच्या परिसरामध्ये हे मुलं-मुली निवासी राहतात.या बाहेरगावच्या मुलांना या ठिकाणी कोणाचा आधार नसतो.ही कॉलेजची सर्व मुले-मुली ही कॉलेजच्या अध्यक्ष व शिक्षक…
जामखेड रत्नदीप मेडीकल फौंडेशन ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर चा अध्यक्ष भास्कर मोरे याने शिक्षणासाठी आलेल्या अनेक मुलिंचे वेगवेगळ्या माध्यमातून शोषण केले आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषणातू या काॅलेज मध्ये शिकणाऱ्या दोन मुलिंनी आत्महत्या केल्या आहेत तर अनेक मुला मुलींनी याच्या जाचाला कंटाळून शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे. या नराधमाच्या कुकर्माचा अतिरेक होतं असताना ग्रामीण भागातील मुली बदनामीच्या भीतीने व शिक्षणात अडथळा निर्माण करून आपल्याला जाणीव पूर्वक नापास करीलं या भीतीनं समोर येऊन बोलायला अथवा पोलिसांत जाऊन तक्रार करायला घाबरत असताना बी फार्म मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने ४ मे २०२३ रोजी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल करण्याचं धाडस केलं आहे .…
सध्या सर्रास सर्वच वयोमानातील लोकांना मूळव्याधाचा त्रास सहन करावा लागत आहे . मूळव्याधीची Piles मुख्य लक्षणे: परंतु जेव्हा त्रास होतो त्यावेळी खालील लक्षणे जाणवू शकतात – मूळव्याध Piles होण्याची कारणे: मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो – आपल्या गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी करून डॉक्टर मूळव्याधीचे निदान करतात. गुदाशयाची व गुदद्वाराची तपासणी प्रथम डॉक्टर आपल्या गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस…