Author: mahalokwani

रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर काॅलेज मध्ये बी. फार्म मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा विनयभंग व अत्याचाराच्या निषेधार्थ दि २३ मे २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता जामखेड येथील खर्डा चौकात संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्ष व इतर संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर काॅलेज ता. जामखेड मध्ये एका मुलीवर खुद्द संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे या नराधमाने विनयभंग व अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली असून दि ४ मे २०२३ रोजी संबंधित पिडीत मुलीने जामखेड पोलीसांत तशी तक्रार दाखल केली आहे . त्या नराधमाने फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत वेळोवेळी विनयभंग केल्याचे…

Read More

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:- जामखेड येथील रत्नद्दीप मेडिकल कॉलेज मध्ये अध्यक्षांनी केलेल्या कृत्याच्या निषर्धात आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी अहमदनगर जिल्हा कार्यालयाबाहेर दलित महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या माध्यमातून मा. संजय जाधव यांच्या मार्फत आमरण उपोषणला सुरवात झाली आहे, पहा व्हिडिओ👇 एकीकडे देशाच्या राजधानीमध्ये महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आंदोलन चालू असताना आता राज्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली आहे. जामखेड शहरातील एका नामांकित संस्थेच्या अध्यक्षांनी यांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करून, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा नोंदवला आहे. पहा व्हिडिओ👇 सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी आत्महत्या केल्याचा प्रकार…

Read More

जामखेड : देशासह राज्यात महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही. एकीकडे देशाच्या राजधानीमध्ये महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आंदोलन चालू असताना आता राज्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे घडली आहे. जामखेड शहरातील एका नामांकित संस्थेच्या अध्यक्षांनी यांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करून, तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा नोंदवला आहे. सदर संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या दोन विध्यार्थीनींनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या आत्महत्यासुद्धा संशयास्पदचं आहेत. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश दलित विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. संजय जाधव यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दिनांक २२/०५/२०२३ रोजी आमरण उपोषण कारण्यासाठीचे निवेदन दिले आहे.…

Read More

जामखेड सर्जिकल व अँक्सिडेंट हॉस्पिटल येथे घेतले उपचार जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार शेळगाव येथील २० वर्षीय गरोदर माहिलेला ९ महिने पूर्ण झालेले होते.स्वंयपाक करताना झटके येवून शेगडी वर पडल्याने तिच्या पाठीला गंभीर जखम झाली असून त्या माहिलेला प्रथमोपचारसाठी तिला जामखेड येथे पाठवण्यात आले पण अनेक हॉस्पीटल मध्ये दाखल करून घेण्यास नकार दिला तिला नगरला हलवावे लागेल असे सांगितले तेव्हा तिला जामखेड सर्जिकल व अॅक्सीडेंट हॉस्पीटल मध्ये आणले तोपर्यंत तिला दोन झटके आले होते येथील डॉ. सचिन टेकाडे व डॉ. सरफराज खान यांनी अॅडमिट करून घेतले व उपचार सुरू केले यावेळी तिला परत झटका आला त्यामुळे सिझर करण्याचा निर्णय घेण्यात आला.…

Read More

जामखेड (प्रतिनिधी); धनराज पवारनुकत्याच झालेल्या कृषि उत्पन्न बाजार समिति,जामखेड निवडणूक निकाल जाहीर झाला तसेच नवनिर्वाचित सभापती पदी शरद कार्ले यांची निवड झाल्याबद्दल आज रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृहात झालेल्या सत्कारप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र काटकर, प्रताप पवार सर, प्रविण बोलभट, राजन समिंदर,आण्णासाहेब ढवळे, दादासाहेब घायतडक,निलेश काकडे, किशोर जरक,वाल्मिक रेडे,सर्जेराव गंगावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे. अंदमानात मोसमी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील काही भागांमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 ते 4 दिवसात दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांत…

Read More

नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयने (RBI) reserve Bank of India केलं आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत. देशात ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. तेव्हापासूनच 2000 हजार रुपयांच्या नोटेबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. 2000 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयने घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2000 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.अखेर आज रिझर्व्ह बँकेने घोषणा केली की, 2000 हजार रुपयांच्या नोटा आता चलनात आणू नयेत. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिला आहे…

Read More

बबनराव धायतोंडे: जिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड : खानवटे तालुका दौंड येथे दिनांक 18 रोजी पहाटे 1 ते 3 या सुमारास चोरांनी एक घर फोडण्याचा प्रयत्न केला व.एक घर फोडले आहे.पोटफोडे वस्ती वरील अनिल पोटफोडे यांच्या घराचे कुलूप तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु आवाज झाल्याने अनिल पोटफोडे जागे झाले व शेजारील विजय नगरे यांना त्यांनी फोन करून बोलवून घेतल्याने नगरे यांनी बँटरी दाखवल्यावर चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व त्यांनी तिथून पळ काढला त्यामुळे पोटफडेे यांच्या घरचा चोरी चा प्रयत्न फसला नंतर लगेच ऐका तासाच्या फरकाने चंद्रकांत गाडे यांच्या घराचा दरवाजा उघडून किचन मधील डबे सामान असता व्यस्त करून त्यातील कुरडया…

Read More

महालोकवाणी न्यूज: जामखेड Jamkhed मधील नामांकित मेडिकल कॉलेजचा आणखी एक प्रताप उघड येण्याची शक्यता आहे, कारण की, इतक्या दिवस अध्यक्ष्यांच्या भीती पोटी आणि आपली इज्जत जाईल या कारणामुळे या कॉलेजच्या मुली पुढे येत नव्हत्या, नुकत्याच अध्यक्ष्यानी जे कृत्य केले आहे, ते शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे आहे , पण खरी वाघीण तर तिला म्हणावे लागेल जिने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली, नाही तर या अध्यक्ष्यानी कित्येक मुलींचे आयुष्य उध्वस्त केले असते माहित नाही, असेच म्हणावे लागेल या कॉलेजमध्ये शासनाला ज्या गोष्टीची पूर्तता लागते त्या सुविधा या कॅम्पसमध्ये पाह्यला मिळत नाही , तरीही या मेडिकल कॉलेजला मान्यता कशी देण्यात आली , याचा…

Read More

महालोकवाणी न्यूज प्रतिनिधी: सध्या जामखेड कर्जत ,श्रीगोंदा, दौंड या ठिकाणी राष्ट्रिय महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम नियमानुसार होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मुरूम न वापरात चक्क माती टाकण्यात येत आहे. यामध्ये आहिल्यानगर ते वजनकाटा इथे रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम चालू आहे, या साईड पट्ट्या भरण्यासाठी मुरमा ऐवजी चक्क मातीने साईड पट्ट्या भरण्याचे काम जोरात चालू आहे. जामखेड शहरात मोठ्या प्रमाणात दळणवळणाचे साधन आहे होत आहे त्या दृष्टीचे या रोडचे काम चांगले होणे महत्वाचे आहे. . या रस्त्याचे काम ,माघील वर्षी सुरू झाले होते. संबंधित कंत्रादारांने रस्त्यावर मुरूम न टाकता फक्त माती टाकली आहे.त्यात वाहने घसरून अनेक लहानमोठे…

Read More