राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. पहिला म्हणजे शरद पवार Sharad Pawar यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. तर शरद पवार पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष व्हावेत, असा दुसरा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी मांडला आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीत या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आला आहे. निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार Sharad Pawar यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी…
Author: mahalokwani
. जामखेड प्रतिनिधी; धनराज पवारजामखेड तालुक्यातील घोडेगांव येथे महामानवांची संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त समस्त घोडेगांव ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये ०५ मे २०२३ रोजी बुध्दपौर्णिमे निमित्त गौतम बुध्द, शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांची संयुक्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे . या निमित्ताने प्रा.संदीप कदम सर( इतिहास अभ्यासक ) यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे . या कार्यक्रमासाठी आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, वंचित बहुजन आघाडीचे अँड. डॉ. अरुण जाधव, ,),नामदेव राळेभात ( जिल्हा अध्यक्ष,भा.मु, मोर्चा, अहमदनगर), जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, गटविकास अधिकारी प्रकाश…
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघात चालला सरांचा करिष्मा, अशी जामखेड तालुक्यात चर्चा.. जामखेड प्रतिनिधी धनराज पवार याबाबत माहिती अशी की, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांच्या पॅनल मध्ये मोठ्या चुरशीने लढवली गेली, दोन्ही पॅनलला नऊ अशा समसमान जागा मिळाल्या.खासदार सुजय विखे गटाला मानणारे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी आमदार राम शिंदे यांच्याबरोबर युतीसाठी चर्चा करीत असताना अचानकपणे आमदार रोहित दादा पवार यांच्याबरोबर एकत्र युती करून बाजार समितीची निवडणूक लढवली. त्यांनाही सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग असल्याने आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचे पारडे जड झाल्याचे चित्र…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शासन या घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे परंतु अद्यापही या समूहातील बहुसंख्य लोक शासकीय योजनेपासून वंचित आहेत ही बाब विचारात घेऊन भटक्या व विमुक्त समाजातील जमातीच्या कल्याणासाठी आराखडा तयार करण्याकरता भटक्या व विमुक्त जमाती जिल्हास्तरीय कल्याण समितीच्या वतीने कार्यकर्ता बैठक मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३/५/२०२३ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत खालील विषयावर सखोल चर्चा झाली अहमदनगर जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जात प्रमाणपत्र , रेशन कार्ड , मतदान कार्ड , शंभर टक्के शालेय…
सबका मालिक एक’, ‘श्रद्धा-सबुरी’ आणि सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ४० हिंदू आणि २१ बौद्ध अशी ६१ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या सामुदायिक विवाह सोहळ्याचे २३ वे वर्ष असून आजतागायत कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्याने २१०० मुलींचे कन्यादान केले आहे. विशेष म्हणजे कोते दाम्पत्याने स्वतःला मुलगी नसताना २१०० मुलींचे कन्यादान केले. महागाईच्या काळात फक्त एक रुपयात विवाह होत असल्याने यावर्षी विदर्भातील ४० तर एकूण ६१ जोडपी विवाह बंधनात अडकली. हे नक्की वाचा : पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेडमध्ये पहिल्यांदाच शतावधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , प्रमुख पाहुणे म्हणून जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील ,उद्योगपती शांतीलालजी गुगळे, डॉ.प्रताप गायकवाड, डॉ. सुरेश काशिद, विश्वदर्शन नेटवर्कचे गुलाब जांभळे ,उमेश देशमुख, कॅप्टन लक्ष्मण भोरे उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील असा अद्भुत कार्यक्रम आज मी पहिल्यांदाच पाहत आहे विचारलेल्या शंभर प्रश्नाचे काही कालांतराने क्रमवार न चुकता माहिती सांगून साध्वीजी परमपूज्य गरिमाजी महाराज आणि दीक्षार्थि मोक्षाजी चोपडा यांनी खरोखर कौतुकास्पद काम केले आहे खरे पाहता आज जन मानसातील लोकांना वेळ नसतो परंतु या जैन साध्वी पायी अनवाणी उन्हा तानाचे चालून जैन धर्माचा प्रचार…
हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची एका प्रकारची सणसणीच पाहायला मिळते. हा अवलिया आपला हवामान अंदाज एका मिनिटात लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअपच्या आणि youtube च्या माध्यमातून सांगत असतो पंजाबराव डख यांचा अचूक अंदाज बऱ्याच वेळा खरा ठरला आहे, त्यांच्या सल्ला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडत आहे, त्यांना विविध प्रकारच्या कार्यक्रमाना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले जात आहे.सध्या महाराष्ट्रात पंजाबराव डख हे नाव प्रसिद्ध होताना दिसत आहे, शेतकऱ्यांचे सुद्धा आत्ता डख यांच्या हवामान अंदाजवर विश्वास बसत आहे त्यांनी आत्ता असे सांगितले आहे की, 1 ते 19 मे 2023 या दरम्यान महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अवकाळी…
आपल्या अदाकारींमुळे प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील हिचे फोटो आणि व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल झाले होते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने उद्या आई-वडील आणि मुलगा यांना विमान नगर पोलीस ठाण्यात होणार हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. गौतमी पाटील Gautami patil हीचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून पुणे पोलीसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. त्यानंतर गौतमी पाटील हीचा व्हिडिओ काढणारा कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला याचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत…
अस्थमा हा देशातील अनेक दशके जुना आजार आहे, परंतु तरीही दरवर्षी त्याचे रुग्ण वाढत आहेत. दम्यामुळे फुफ्फुसात संसर्ग होतो. त्यामुळे श्वसनाचा त्रास आणि खोकला सुरू होतो. छातीत घट्टपणा आणि श्वासासोबत घरघर या समस्यांनाही अनेकांना सामोरे जावे लागते. कोविडनंतर दम्याच्या (Ashtma )रुग्णांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. कोविडचा (Covid) सर्वाधिक धोका अस्थमाच्या रुग्णांना असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोविड हा श्वसनमार्गाचा संसर्ग आहे. त्यामुळे या विषाणूचा दम्याच्या रुग्णांवर चांगलाच परिणाम झाला आहे. अस्थमाच्या रुग्णांना कोविड विषाणूच्या उच्च लक्षणांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे दम्याच्या रुग्णांना फुफ्फुसात जळजळ, न्यूमोनिया, फायब्रोसिस अशा समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, हे लोक कोविड आणि अस्थमाच्या…
रामदास फुटाणे माझे आदर्श – नागराज मंजुळे जामखेड । धनराज पवार “जामखेडचे भूमिपुत्र असणारे जेष्ठ कवी व सिने दिग्दर्शक व प्रसिद्ध वात्रटिकाकार मा.आ. रामदास फुटाणे उर्फ नाना यांची जगात ख्याती आहे. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षाने भरलेले आहे. त्यांनी काढलेला पहिला चित्रपट सामना हा खूप गाजलेला चित्रपट आहे. चित्रपट काढायला पैसे लागतात परंतु या माणसाकडे पैसे नसतानाही यांनी पहिला चित्रपट काढला. नवीन पिढीला नानांकडून खूप काही घेण्यासारखा आहे. नाना माझे आदर्श आहेत.” असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी येथे केले. जामखेड चे भूमिपुत्र जेष्ठ कवी व सिने दिग्दर्शक निर्माते व प्रसिद्ध वात्रटिकाकार मा.आ.रामदास फुटाणे यांचा जामखेडच्या ग्रामस्थांच्या वतीने नागरी…