तारण कर्ज देणारी मूळ कंपनी HDFC लिमिटेड आणि देशातील सर्वात मोठी खाजगी बँक ‘HDFC बँक’ 1 जुलैपासून एक होणार आहे. एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी मंगळवारी दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण 1 जुलैपासून लागू होणार असल्याची घोषणा केली. यासह, 13 जुलैपासून एचडीएफसी लिमिटेडच्या स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध केलेल्या शेअर्सचे ट्रेडिंग एचडीएफसी बँकेच्या नावाने केले जाईल. 30 जून रोजी दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांची विशेष बैठक होणार असून, त्यात विलीनीकरणासंबंधी आवश्यक मंजुरी देण्यात येणार आहेत. या विलीनीकरणाचा परिणाम एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक या दोन्ही कर्जदारांच्या करोडो ग्राहकांवर होणार आहे. दीपक पारेख म्हणतात की 30 जून रोजी एचडीएफसीच्या बोर्डाची शेवटची बैठक होणार आहे. एप्रिलमध्ये, भारतीय…
Author: mahalokwani
सोमराज बडे,पाथर्डी वृत्तसेवा: बुधवार दिनांक २७ जून 2023 रोजी चिंचपूर पांगुळ येथील श्री. वामनभाऊ विद्यालयात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा “गुणगौरव सोहळा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत वामभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आली. हे नक्की वाचा: Panjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी.. इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संघर्षयोद्दा बबनराव ढाकणे केदारेस्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरोडे सर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,रोख बक्षिसे,प्रशिस्तीपत्रे व गुलाब-पुष्प देवून स्वागत केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऋषिकेश ढाकणे हे होते…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आज दिनांक 27/6/2023 रोजी सायंकाळी जामखेड शहरात जामखेड पोलीसांच्या वतीने आषाढी एकादशी व बकरी ईद अनुषंगाने शहरात रूट मार्च काढण्यात आला मार्च घेण्यात आला. हा रूट मार्च जामखेड पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन बीड कॉर्नर-जयहिंद चौक-काझी गल्ली-सय्यदनगर-खर्डा रोड- तपनेश्वर रोड-नुराणी कॉलनी-खाडे नगर-बस स्थानक-मेन रोड-खर्डा चौक असा संपला. हे पण वाचा Panjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी.. आषाढी एकादशी व बकरी ईद हि एकाच दिवशी आल्याने त्या अनुषंगाने शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला, जामखेड मधील मुस्लिम धर्मियांनी आषाढी एकादशी दिवशी बकरी…
समस्त फुले, शाहू, आंबेडकरी,साठे चळवळीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन. . अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये मनपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा देखील पूर्ण कृती पुतळा नगर शहरात सिद्धार्थ नगर येथील साठे चौकात आहे त्या ठिकाणी बसवण्याच्या मागणीसाठी समस्त फुले.शाहू. आंबेडकरी.साठे.चळवळीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड समवेत सोमा शिंदे, संपर्कप्रमुख नितीन कसबेकर, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे, शोभा गाडे, महेमूदा पठाण, किरण जाधव, एकनाथराव गायकवाड, रेखा डोळस,…
जामखेड च्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीची अजब कारभार आपल्याला पाहायला मिळत आहे, माघील २० वर्षा पासून या संस्थेवर बोगस संचालक मंडळ काम करीत आहे, असा दावा विलास साठे यांनी केला आहे, कारण चेंज रिपोर्टला धर्मादाय आयुक्ताची परवानगी मिळालेली नाही, मे2023 महिन्यात गुपचूप निवडणूक घेण्यात आली . व नवीन सचालक मंडळाचा बदल अर्ज धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांना सादर करण्यात आला आहे . सा शिक्षण संस्थेला एकशे सोळा 116 सभासद आहेत. हे सभासद स्व.बन्सीसेठ कोठारी व दिलीप बाफना यांच्या काळात सभासद केले होते . त्यानंतर 2001 नंतर या संस्थेला अधीकृत सचालक मंडळच नसल्या मुळे नवीन सभासद करण्याचा कोणालाच अधिकार नाही . सदर संस्थेची…
भारतात शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज फार महत्त्वाचा असतो. परभणी इथले पंजाबराव डख Panjanrao Dakh हे आपल्या हवामान अंदाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितलेला अंदाज अचूक ठरत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. दरम्यान हवामान अंदाज दर्शविणारे हे पंजाबराव डख Panjanrao Dakh खरंच हवामान अभ्यासक आहेत का ? त्यांचं शिक्षण काय जाणून घेऊ या लेखातून थोडक्यात अखेर पंजाबराव डख यांचा अंदाज खरा ठरला.! https://mahalokwani.com/?p=5548 पंजाबराव डख कसे प्रसिद्ध झाले? परभणीतले पंजाबराव डख Panjanrao Dakh शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज पोहोचवत असतात. यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात. ते व्हॉटसप आणि युट्यूबच्या माध्यमातून हवामान Weather अंदाज लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात.…
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. पंकजा मुंडे यांना दोन प्रमुख पक्षांनी ऑफर दिली आहे, एवढच नाही तर मुख्यमंत्रिपद देऊ असं आश्वासनही पंकजा मुंडे यांना देण्यात आलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत. पंकजा मुंडेंनी बीआरएसनं ऑफर दिल्याची माहिती समोर आली असतानाच एमआयएमही त्यांच्यासाठी आग्रही आहे. दोन वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंना एमआयएमनंही पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते. पंकजा मुंडेंच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच बीआरएसनंही त्यांना ऑफर दिलीय. पंकजा मुंडे यांच्यासाठी अनेक पक्षांनी फिल्डिंग लावल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय…
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे , शनिवार दिनांक २४ जून २०२३ रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मान्सूनच्या सरी पडण्यास सुरवात झाली, रविवारी दिनांक २५ जून २०२३ रोजी मान्सूनने चांगला वेग धरला आहे, त्यादृष्टीनं शेतकरी तयारीला लागले आहेत. सध्या शेतकऱ्यांची Seeds Buying खते, बी बियाणे खरेदीसाठी Buying लगबग सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपुर्वीच्या कामाच्या मशागतीला लागले आहेत. तसेच बियाणांची खरेदी Buying देखील करत आहेत. बी बियाणे खरेदी Seeds Buying करतांना शेतकऱ्यांनी काळजी घेणे, महत्वाचे आहे बोगस Seeds बी बियाणांचा सध्या मार्केटमध्ये सुळसुळाट चालू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करतांना आपली फसवणूक तर होत…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवारजामखेड पोलीस स्टेशन येथे दिनांक-24/06/2023 रोजी मस्जिद चे सर्व मौलाना, बकरी ईद साजरे करणारे कुरेशी लोक यांची बकरी ईद व आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मीटिंग घेण्यात आली आहे. आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सन साजरे करा असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे, या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे 1) बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी आल्याने उघड्यावर कुरबानी करू नये.2)बकरे कापल्यानंतर त्यांची वेस्टेज हे उघड्यावर तसेच रस्त्याच्या कडेला न फेकता ते खड्डा करून झाकून टाकावे.3) कोणत्याही…
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी: या बाबत सविस्तर असे की, जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या बी. फार्मसी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थींनींचा विनयभंग केल्या प्रकरणी संस्थाचालक भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. ४ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर मोरे हे बऱ्याच दिवस जामखेड मधील विवाह समारंभात दिसून आले होते, गुन्हा दाखल होऊनही भास्कर मोरे हे जामखेड मध्ये वास्तव्यास होते , त्यांनी कोर्टालाही चुकीची माहिती देऊन, तात्पुरता जामीन मिळवला होता, त्यानंतर सर्व बाबी उघड झाल्यानंतर श्रीगोंदा कोर्टाने मोरेचा जामीन अर्ज फेटाळला. यानंतर मोरेंनी औरंगाबाद खंडपीठात आपल्याला अटक…